लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नाशिक, ०२ जानेवारी: मालेगांव शहरातील जाफरनगर भागात राहणाऱ्या एका गल्लीतील उड्डाणटप्पू युवकाच्या एकतर्फी प्रेम व लग्नाला दिलेला नकार आणि त्यातून सतत होत असलेल्या छेडछाडीला कंटाळून एका २० वर्षीय तरुणीने विष घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घडल्याने परिसरात एकच खडबड उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक तरुणीचे नाव आशिया मोहंमद कासीम असे आहे. हा सर्व प्रकार एकतर्फी प्रेमातून घडला असून माझ्या बहिणीला आत्महत्या करण्यास भाग पाडणारा तरुणा व त्याच्या साथीदारावर कडक कारवाई करण्याची मागणी मयत तरुणीच्या बहिणी अफरीन शेख हिने केली.
मृतक तरुणीवर याच भागात राहणारा शमीम अन्सारी हा तरुण एकतर्फी प्रेम करत होता. त्यामुळे तो नेहमी तिचा पाठलाग करायचा. या तरुणाने एकदा मृत तरुणीला लग्न करण्यासाठी मागणी घातली होती. मात्र या तरुणीने शमीमला लग्नास नकार दिला.
मृत आसिफाने लग्नाला नकार दिल्यामुळे शमीम पुन्हा पुन्हा तिला विचारणा केली. पण, प्रत्येकवेळी तिने स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यामुळे शमीम आणि त्याच्या साथीदाराने मृत तरुणीची रोज छेड काढत होते. या छेडछाडीला कंटाळून अखेर आज या तरुणीने विष घेऊन आत्महत्या केली असल्याचा आरोप मयत तरुणीच्या बहिणीने केला आहे.
आपल्या बहिणीच्या मृत्यूला शमीम आणि त्याचे साथीदार कारणीभूत आहे, त्यांच्यामुळेच माझ्या बहिणीने आत्महत्या केली, त्यामुळे दोषी शमीम आणि त्याच्या साथीदारावर कडक कारवाई करण्याची मागणी, अफरीन शेख हिने केली आहे.
या प्रकरणी पवारवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.
हे देखील वाचा :
पोलीस विभागामार्फत अतिदुर्गम भागातील १९ कुटुंबाना गॅस सिलेंडरचे वाटप