आमच्या नेत्यांना व पक्षाला बदनाम करण्यासाठी बातम्या पेरण्याचे कटकारस्थान सुरू आहे – मंत्री नवाब मलिक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २ जुलै : आमच्या नेत्यांना बदनाम करण्यासाठी व पक्षाला बदनाम करण्यासाठी बातम्या पेरण्याची कटकारस्थानं सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व परिवाराच्याबाबतीत ज्यापध्दतीने बातम्या पेरण्यात येत आहेत ते चुकीचे आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

साखर कारखाना ईडीने सीस केला आहे. ज्या काही कायदेशीर कारवाई आहेत ते ईडी करत असेल. परंतु अजितदादा व त्यांच्या परिवारातील कुणीही बेकायदेशीर कामे केलेली नाहीत अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

हे देखील वाचा :

‘कोरोना’ संकट काळातील पोलिसांची कामगिरी उल्लेखनीय – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार

धक्कादायक! ५ मित्रांकडून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

कोरोनामूळे मृत आरोग्य सेवकाच्या कुटूंबाला मिळाले विम्याचे ५० लक्ष!

 

lead storyNawab Malik