लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, 17,ऑक्टोबर :- अगदी शेवटच्या क्षणी भाजपचे उमेदवार मुरजी।पटेल।यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. पक्षादेश आल्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांना अखेरच्या क्षणी रिंगणातून माघार घ्यावी लागली आहे. असे असले तरी २५ अपक्षांपैकी किती माघार घेतात हे सुध्दा पहावे लागेल !
आज अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली होती. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही हाच सूर लावला होता. त्यामुळे गेल्या २४ तासांमध्ये राजकीय चक्रं फिरली आणि त्याची परिणती भाजपने मुरजी पटेल यांना अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा आदेश देण्यात झाली. या सगळ्यामुळे अंधेरीतील मुरजी पटेल यांच्या कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत.
हे देखील वाचा :-
गारखेडा गाव विकणे आहे ! ग्रामपंचायत बंद, शाळा बंद, मतदानावर बहिष्कार