लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी विविध कार्यकारी संस्था मार्फत धान केंद्र चालवले जाते जिल्हात पावसाळा हंगामा संपले असुन शेतकऱ्यांकडून धान खरेदी केले सदर धान्य आज पर्यंत धान खरेदी केंद्राच्या गोदामत धान्य साठा जमा करून ठेवण्यात आले असुन उचल केले नाही. त्यामुळे सदर धान्य लवकरात लवकर उचल करण्यात यावी.
तसेच जिल्हात दुबारा पिक घेणारे शेतकरी बांधवा मोठ्या प्रमाणात असुन पिक घेतलेले आहे. मात्र आता धान खरेदी केन्द्र बंद असल्याने शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी विविध सहकारी मार्फत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
हे देखील वाचा :
सेंद्रीय शेतीचा जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याला ओळख मिळावी – पालकमंत्री एकनाथ शिंदे
दिलासादायक ! गडचिरोली जिल्ह्यात आज कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट..