ईडी ची चौकशी म्हणजे लोकशाहीचा खून – यशोमती ठाकुर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती, २८ डिसेंबर: भाजपच्या विरोधात जे कोणी बोलल त्यांच्यावर ईडी ची चौकशी लावण्यात येत आहे. त्यामुळे ईडी ची चौकशी म्हणजे लोकशाही चा खून होत असल्याची टिका राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली. ज्या भाजपच्या लोकांच्या अकाउंटमध्ये अवैधरीत्या पैसे जमा झालेत त्यांच्यावर ईडी चौकशी का लागत नाही? ज्यांनी-ज्यांनी भाजपची सत्यता समोर आणली त्याच्यावर ईडी ची कारवाई होत आहे. त्यामुळे देशाच राजकरण अतिशय खालच्या स्तरावर  जात असून, ईडी सोबतच शेतकऱ्यांच सुद्धा राजकरण होत आहे, ज्या राजधानी मध्ये शेतकरी आंदोलनाला बसतात त्याच ठिकाणी देशाचे प्रमुख दीपावली मणवितात. अशीही टिका त्यानीं यावेळी केली.   

Yashomati Thakur