लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क ०६ नोव्हेंबर :- परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून यासाठी राज्य शासनाकडून 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे मात्र हे पॅकेज दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळेल का असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकला होता यावर बोलताना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत मिळेल काही तांत्रिक कारणांमुळे विलंब होत आहे परंतु दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत मिळेल असे संकेत दिल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे.