अखेर मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले पूर्ण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई : दि. 22 डिसेंबर,  महाराष्ट्र विधानसभेत महायुतीला बहुमत मिळून  महायुतीचे सरकार स्थापन होऊन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. तर अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर १५ डिसेंबरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेचच राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले. या हिवाळी अधिवेशनापूर्वी किंवा त्यादरम्यान खातेवाटप होईल, अशी अपेक्षा होती. परंतु अधिवेशन संपल्यानंतर रात्री उशीरा खातेवाटप जाहीर करण्यात आले.

फडणवीस यांच्याकडे गृह, ऊर्जा, जीएडी, एकनाथ  शिंदे : नगरविकास, एमएसआरडीसी अन् गृहनिर्माणही, अजित पवार : वित्त-नियोजन, उत्पादन शुल्कही,  चंद्रशेखर बावनकुळे – महसूल, बाबासाहेब पाटील – सहकार, कोकाटे कृषी,  प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य, सरनाईक परिवहन, फुंडकर – कामगार, अदिती  तटकरे-  महिला व बालकल्याण, भुसे – शालेय शिक्षण, उईके आदिवासी विकास, संजय  शिरसाट – सामाजिक न्याय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, सामान्य प्रशासन (जीएडी), ऊर्जा (नवीनीकरण ऊर्जा वगळून), विधी व न्याय आणि माहिती-जनसंपर्क ही खाती असतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकाससह गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम  (सार्वजनिक उपक्रम म्हणजे एमएसआरडीसी ) तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व उत्पादन शुल्क हे खाते असेल. महत्त्वाचे मानले जाणारे महसूल खाते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले आहे. शिंदेसेनेचे दादा भुसे हे राज्याचे नवे शालेय शिक्षण मंत्री असतील. प्रताप सरनाईक यांना परिवहन, पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री झालेले भाजपचे आकाश फुंडकर हे नवे कामगार मंत्री असतील. ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, पशुसंवर्धन व दुग्धविकास अशा काही खात्यांची विभागणी करण्यात आली. गृहखात्याचे राज्यमंत्रिपद भाजपच्या माधुरी मिसाळ (शहरे) व पंकज भोयर (ग्रामीण) यांना मिळाले.

शिंदेसेनेचे शंभूराज देसाई यांच्याकडील महत्त्वाचे उत्पादन शुल्क खाते अजित पवारांकडे गेले. त्यांना पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण ही खाती मिळाली. असे आहे. शिंदेसेनेचे प्रकाश आबिटकर हे नवे सार्वजनिक आरोग्य मंत्री असतील. अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील नवे सहकार मंत्री असतील. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे माहिती व तंत्रज्ञान आणि  सांस्कृतिक कार्य खात्याची जबाबदारी देण्यात आली. गणेश नाईक हे नवे वनमंत्री असतील.पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री झालेले भाजपचे जयकुमार गोरे यांच्याकडे  ग्रामविकास हे महत्त्वाचे खाते गेले. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना गृह (शहरे)  दत्ता भरणे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास

हसन मुश्रीफ यांच्याकडे  वैद्यकीय शिक्षण हे  तर  चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कामकाज हे खाते  कायम राहिले. अदिती तटकरे यांना महिला व बालकल्याण खाते पुन्हा मिळाले. गुलाबराव पाटील यांच्याकडे पूर्वीचेच पाणीपुरवठा व स्वच्छता खाते तर संजय राठोड यांच्याकडे मृदा व जलसंधारण खाते कायम राहिले. मंगलप्रभात लोढा यांच्याकडेही कौशल्य विकास खाते कायम आहे. उदय सामंत यांच्याकडे उद्योग खाते पुन्हा देताना मराठी भाषा खातेही देण्यात आले. अतुल सावे यांना पूर्वीचे ओबीसी कल्याण खाते देतानाच ऊर्जा (नवीनीकरणीय ऊर्जा), दुग्धविकास ही खाती देण्यात आली.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा खाते देताना ते विभागून देण्यात आले. त्यांची आधीची दोन्ही खाती गेली. त्यांच्याकडे गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचा कारभार असेल. तर  गिरीश महाजन यांना  जलसंपदा (विदर्भ व तापीखोरे) आणि आपत्ती व्यवस्थापन अशी खाती देण्यात आली. अन्न व नागरी पुरवठा हे खाते धनंजय मुंडेंकडे गेले. माणिकराव कोकाटे हे नवे कृषी मंत्री असतील. जयकुमार रावल यांनाही पणन व राजशिष्टाचार ही तुलनेने कमी महत्त्वाची खाती मिळाली. पंकजा मुंडे यांना यावेळी पर्यावरण आणि हवामान बदल, पशुसंवर्धन अशी खाती देण्यात आली. भरत गोगावले यांना रोजगार हमी, फलोत्पादन, खारपाण पट्टा विकास या खात्यांवर समाधान मानावे लागले.