अखेर.. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी हटविण्याचा घेतला राज्य सरकारने निर्णय

अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय .
  • सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध झुगारुन चंद्रपूरमधील दारु बंदी उठवली.
  • दारू बंदी उठवू नये अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांची होती.
  • अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर :  वर्ष २०१५ ला चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची घोषणा करण्यात आली होती. दारुबंदीनंतर जिल्ह्यात अवैध दारूचा महापूर आला. महाविकास आघाडी सरकार आल्यावर पालकमंत्री वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटविण्यासाठी पाठपुरावा केला मात्र आज राज्याच्या कॅबिनेट मध्ये झालेल्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.

लवकरच प्रशासकीय पद्धतीने जिल्ह्यात दारूबंदी हटविण्यात येणार आहे.

 

chandrapur districtlead story