- वेलगुर ते टोल रस्त्याचे भूमीपूजन तर इंदिरा नगर वेलगुर येतील माता मंदिराचे उदघाटन संपन्न.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. २५ मार्च: वेलगुर परिसरात कल्लेम रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे, वेलगुर-गोमणी रस्ता, शंकरपूर रस्ता व अनेक समस्याचे निराकरण करण्याची नागरिकांची मागणी केली होती. शंकरपूर येथील माता मंदिर, वेलगुर येथील इंदिरा नगर मधील माता मंदिर बांधकामाची मागणी नागरिकांनी केली होती. ‘सदर कामे प्राधान्याने पूर्ण करू शकलो याचा मला मनापासून आनंद आहे’ अशी भावना गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी व्यक्त केलेली आहे.
इंदिरानगर येथील माता मंदिर उदघाटन समारंभ कार्यक्रमात जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवारबोलतांना म्हणाले, ‘आलापली-वेलगुर क्षेत्रातून मी जेव्हा पाहिलंदा जि.प.साठी उभे झालो असता नागरिकांनी सदर रस्त्याचे व पुलाच्या बांधकामामाबत तसेच माता मंदिर येथील बोरवेल असे अनेक कामाची मागणी माझ्याकडे केली होती. मी नागरिकांना या भागाच्या विकासासाठी कटिबद्ध असुन जास्तीत जास्त कामे करून देणार. असा शब्द दिला होता. सदर शब्द मी पूर्ण करीत जास्तीत जास्त जिल्हा परिषदेचे विकास निधीतुन मंजूर करू शकलो’ याचा मनापासून आनंद असल्याचे ते यावेळी बोलतांना म्हणाले.
सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथि म्हणून अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, उपसभापती गीताताई चालुरकर, वेलगूरचे सरपंच किशोर आत्राम, उपसरपंच उमेश मौहूर्ले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर माजी सरपंच लालू करपेत, माजी उपसरपंच अशोक येलमूले, ग्रा.प.सदस्य, वामनराव मडावी, कन्न्नाके आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी गावातील महिला व पुरुष बहूसंख्येनी उपस्थित होते.