मायक्रो फायनान्स कंपन्यांना चाप लावण्याची मागणी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
रायगड : कोरोनाच्या या महामारीत महिला बचतगटांना कर्जाचे हप्ते भरणे अशक्य झाले आहे तर दुसरीकडे विमा काढूनही त्याचा लाभ मिळत नाही त्यामुळे हे कर्ज माफ करून मिळावे या मागणीसाठी मनसेच्या वतीने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर आज रोजी महिला मोर्चा काढण्यात आला. एकीकडे व्यवसाय नाही आणि दुसरीकडे मायक्रो फायनान्स कंपन्या कर्जवसुलीसाठी तगादा लावता आहेत. विमा हप्ता भरूनही त्याचा लाभ ही मिळत नाही. अशा तिहेरी संकटात हे महिला बचतगट सापडले असुन सरकारने या कंपन्यांना चाप लावावा, अशी मागणी मोर्चेकऱ्यां या वेळी केली. मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. मोठ्या संख्येने कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते