लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. २५ मार्च: अहेरी नगरपंचायत मधील प्रभाग क्रमांक ५ मधील हातपंप बंद असल्याने प्रभागातील नागरिकांना अडचण निर्माण होत असुन याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.
आज आविसचे कार्यकर्ते साईनाथ औतकर यांनी अहेरी नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांना हातपंप दुरुस्त करून देण्याकरीता निवेदन देवून मागणी केली आहे.