लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, 29, ऑक्टोबर :- शिंदे-फडणवीस सरकार ने महाविकास आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. छगन भुजबळ, नाना पटोले, वरूण देसाई, जयंत पाटील, सतेज पाटील, विजय वड्डेटीवार, बाळासाहेब थोरात, संजय राउत, धनंजय मुंडे, नवाब मलिक यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. तर मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे.
जितेंद आव्हाण यांची सुरक्षा जैसे थे ठेवण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे आणि माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे.
हे देखील वाचा :-