शिवसेनेचाच मुख्यमंत्री पूर्ण ५ वर्ष राहील – संजय राऊत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई डेस्क : महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून धुसफूस असली तरीही पुढील पाच वर्षात मुख्यमंत्री पदाची कोणतीही वाटा घाटी होणार नाही, त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री पूर्ण पाच वर्षे राहील असं खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.

महाविकास आघाडी स्थापन करतेवेळी मी त्या प्रक्रियेतील एक घटक असून त्यावेळी जे ठरलं ते ‘आमचं ठरलंय’ असं सांगत कॉग्रेस पक्षातच नाही तर अनेक पक्षात मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाची इच्छा असणं गैर नाही असंही राऊत म्हणाले आहे.

महाविकास आघाडीत 3 स्वतंत्र विचारधारेचे पक्ष एकत्र आहे. परिणामी काँग्रेसकडून नाना पटोले यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका कार्यक्रमात बोलून दाखवली आहे.

हे देखील वाचा :

सोशल मिडीयावर व्हीडीओ व्हायरल करुन संपवली जीवन यात्रा

मृताच्या नातेवाईकांनी केली इंटर्न डॉक्टरला मारहाण!, तीन लोक पोलिसांच्या ताब्यात

lead storysanjay raut