लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
लातूर : शहरा जवळच्या हरंगुळ भागात राहणाऱ्या दोन बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचं कारण अदयाप स्पष्ट झालेलं नसलं तरी पोलीस या आत्महत्ये मागचं कारण तपासत आहेत. गीतांजली बनसोडे (१७) आणि धनश्री क्षिरसागर (२०) असं आत्महत्या केलेल्या या दोघ्या मावस बहिणीचं नाव आहे.
धनश्री आणि गीतांजली या बहिणी हरवल्याची तक्रार दोघींच्याही आई-वडिलांनी नुकतीच पोलिसांत दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या दोघीना पुण्यातून गावी आणून आई-वडिलांच्या स्वाधीन केले होते. असं त्यांचे नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर आज सकाळी या दोघी घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या आहेत.
मात्र अद्याप या दोनही बहिणींनी आत्महत्या का केली याचे कारण समोर आले नाही. या दोघी काही दिवसांपूर्वी बाहेर गावी गेल्या होत्या का? कोणासोबत गेल्या होत्या? या दोघींनी भीती पोटी आत्महत्या केली का? अशा शंका सध्या उपस्थित केल्या जात आहेत. मात्र संशयीत आरोपीस अटक करण्याची मागणी मुलींचे नातेवाईक करत आहेत.
हे देखील वाचा :
गडचिरोली जिल्ह्यात आज 15 कोरोनामुक्त तर 10 नवीन कोरोना बाधित