रस्तेकामांतील ढिलाई थांबवा; गुणवत्तेवर तडजोड नाही – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचा कडक इशारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : जिल्ह्यातील प्रलंबित रस्ते बांधकामांवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी थेट कारवाईचा इशारा दिला. राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या बांधकाम यंत्रणांना त्यांनी स्पष्ट सांगितले की, “कामाची गुणवत्ता आणि मुदत या दोन्ही बाबतीत तडजोड होणार नाही; जबाबदार अधिकाऱ्यांवर थेट कारवाई केली जाईल.”

जिल्ह्यातील प्रमुख रस्ते प्रकल्पांचा आढावा घेताना अविश्यांत पंडा यांनी विलंबाचे कारण न सांगणाऱ्या अधिकाऱ्यांना फटकारले. सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यात २९५ किमी तर राष्ट्रीय महामार्ग विभागाने ५४६ किमी रस्त्यांची माहिती दिली; मंजुरी मिळाल्यानंतरही अनेक कामे वर्षभर सुरू न झाल्याचे लक्षात आले. काही कामांसाठी वन विभागाची अडचण असल्याचे सांगितले असतानाही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की “वन विभागाकडून अडचण नाही; केवळ समन्वयाच्या अभावामुळे कामे अडकली आहेत. अनावश्यक कारणे देणे थांबवा आणि तातडीने पाठपुरावा करा.”

ट्रिफॉलिंगमुळे अनेक ठिकाणी काम सुरू न झाल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी सांगितले की, “अपूर्ण कामांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अडचण नसलेल्या ठिकाणी काम तात्काळ सुरू करा.” वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई होण्याचे निर्देश दिले गेले असून, मुदतवाढ देताना ही कारवाई कठोर स्वरूपाची राहावी असेही सांगितले.

जिल्हाधिकारी पंडा यांनी बांधकाम गुणवत्तेबाबतही तीव्र नाराजी व्यक्त केली; “गुणवत्तेची कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. दोषींवर थेट कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. महसूल मंडळांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवासी गाळ्यांच्या दुरुस्तीवरही निर्देश देऊन, काम तातडीने पूर्ण करण्यासाठी यंत्रणांना सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून स्थानिकांना दिले पट्टे ..

gadchiroli road issueIAS panda on action moderepaire all road in gadchiroli
Comments (0)
Add Comment