लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती जिल्ह्याचा खा. नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र बनावट असल्याचा ठपका मुंबई उच्च न्यायालयाने ठेवला होता, तसेच नवनीत राणा यांना दोन लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला होता.
खा नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी धाव घेतली असून आज सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावर जात वैधता प्रमाणपत्राचा निपटारा होऊ पर्यंत स्थगनादेश दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने खा नवनीत राणा यांना स्थगन आदेश दिल्यानंतर अमरावती शहरात युवा स्वाभिमान च्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
आजच्या सुनावणीकडे सर्व महाराष्ट्र च तसेच युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा :
ओबीसी आरक्षणासाठी भाजपा रस्त्यावर उतरणार – माजी राज्यमंत्री तथा आ. डॉ परिणयज फुके यांचे प्रतिपादन
नाट्यनिर्मिती संस्थांचे अनुदान तातडीने वितरीत करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश