आपल्या दमडीचाही हिशोब त्यांनी ईडी ला द्यावा

दमबाजी करू नये आणि भाजपा दमबाजी ला घाबरत नाही – आशीष शेलार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती, दि. २८ डिसेंबर: आपल्या दमडीचाही हिशोब संजय राऊत यांनी ईडी ला द्यावा, दमबाजी करू नये आणि भाजपा दमबाजी ला घाबरत नाही, असे जोरदार प्रतिउत्तर आशीष शेलार यांनी अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना दिली. सगळ्या एजन्सीवर दबावतंत्राचा राजकारण शिवसेना करून पाहत आहे. सर्व एजन्सी व स्टेटमेंट घेऊन या एजन्सीच् पावित्र जनता राखणार की नाही? याचांच प्रश्न निर्माण होईल. भाजपा अशा कुठल्याही पक्षाला या एजन्सीवर दबावतंत्र करुन काम करू देणार नाही.

कंगना राणावत यांचं घर तोडतांना मर्दानगी होती का? कंगना राणावत यांना मुंबई मध्ये येऊ देणार नाही त्यांचं तोंड फोडून तेव्हा शिवसेनेला मर्दानगी आठवली नाही का? त्यामुळे शिवसेनेने अधीर स्वतःकडे बघावं स्वतःच्या पायाखालची जमीन घसरली, कर नाही तर डर कशाला, मग डर जऱ असेल तर तो डराव डराव राउतांनी केला. अशी टिका आशीष शेलार यांनी अमरावती मध्ये केली.

संजय राऊत जे काही बोलत आहेत ते सत्यहीन बोलत आहे. एका नोटीस मध्येच संजय राऊत पूर्ण हादरून गेले आहे. हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे, त्यांनी चूक केली नसेल तर त्यांना घाबरायच कारण नाही. या देशात कायद्याच् राज्य आहे, आणि त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशीही प्रतिक्रिया आशीष शेलार यांनी दीली.