जे खरं सत्य आहे ते महाराष्ट्रातील जनतेसमोर १०० टक्के येईल – अजित पवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २५ मार्च: जी वस्तुस्थिती आहे… जे खरं सत्य आहे ते महाराष्ट्रातील जनतेसमोर १०० टक्के येईल काळजी करण्याचे कारण नाही अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख रशीद यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी माध्यमांनी अजित पवार यांच्याशी संवाद साधला असता अजित पवार यांनी आपले मत मांडले.

गेले काही दिवस राज्यात जे काही वातावरण तयार करण्यात आले. त्यामध्ये कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. चौकशा सुरू आहेत. NIA सुध्दा चौकशी करतेय आणि ATS सुध्दा करत होती. परंतु काल ठाणे कोर्टाने NIA कडे तपास देण्यास सांगितले. आम्हाला भेदभाव करायचा नाही मात्र काही बाबतीत चौकशी करण्याची गरज असेल तर केली जाईल असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

ajit pawar