बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, हृदयविकाराने घेतला जीव…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

सुरभी पाटील मुंबई, 4,ऑगस्ट :- बॉलिवूडमधून एक मोठी दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेते मिथिलेश चतुर्वेद यांचं निधन झालं
मिथिलेश यांनी 3 ऑगस्ट रोजी संध्याकाळी लखनौमध्ये आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.गेल्या काही महिन्यांपासून ते हृदयाशी संबंधित समस्येचा सामना करत होते. मिथिलेश चतुर्वेदी यांना काही काळापूर्वी हृदयविकाराचा झटका आला होत.

मिळालेल्या माहितीनुसार, उपचारासाठी ते त्यांच्या मूळगावी लखनऊला स्थायिक झाले होते. मात्र काल ३ ऑगस्टला त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. बुधवारी त्यांनी लखनऊमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांचे जावई आशिष चतुर्वेदी यांनी याबाबत फेसबुक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे

मिथिलेश चतुर्वेदी यांनी 1997 मध्ये ‘भाई भाई’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर ते ‘सत्या’, ‘ताल’, ‘फिजा’, ‘रोड’, ‘कोई मिल गया’, ‘बंटी और बबली’, ‘क्रिश’ आणि ‘गांधी माय फादर’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये झळकले. या चित्रपटांमध्ये साकारलेल्या वेगवेगळ्या पात्रांमुळे मिथिलेश चतुर्वेदी यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 2020 मध्ये ते ‘स्कॅम 1992’ या वेब सीरिजमध्ये सुद्धा दिसले होते.
त्यामुळे अचानक घडलेल्या या घटनेमुळे बॉलीवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

हे देखील वाचा :- 

“स्वातंत्र्याचा अमृत महोत्स्व” अंतर्गत निबंध स्पर्धा

RIP mithilesh chaturvedi