देशातील सर्व राज्यांना ३१ जुलैपर्यंत ‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ योजना लागू करण्याचे सुप्रीम कोर्टाने दिले आदेश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : ‘वन नेशन, वन रेशनकार्ड‘ योजनेसंदर्भात सुप्रीम कोर्टानं आज मोठा निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टानं देशातील सर्व राज्यांना ३१ जुलैपर्यंत ‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ योजना लागू करण्याचे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश अशोक भूषण यांच्या खंडपीठानं आज याबाबतचा निकाल दिला आहे.

देशातील सर्व राज्यांनी तातडीनं ‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ योजना लागू करणं खूप गरजेचं आहे. जेणेकरुन प्रवासी मजुरांना देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात या योजनेचा लाभ घेता येऊ शकेल, असं कोर्टानं म्हटलं आहे.

कोरोनामुळे स्थलांतरीत कामगारांच्या सोयी-सुविधांसंदर्भात संबंधित राज्य सरकारांना यावेळी सुप्रीम कोर्टानं उत्तम नियोजन करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. प्रवासी मजुरांना अन्नधान्य उपलब्ध करुन देणं आणि त्यांच्यासाठी ‘कम्युनिटी किचन’ यापुढील काळातही सुरु ठेवण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत.

हे देखील वाचा :

सोशल मीडियावर विदेशी व्यक्तीसोबत झालेली ओळख अमरावतीच्या महिलेला पडली महागात…

पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी असताना देखील नागरिकांची …या धबधब्यावर प्रचंड गर्दी

धक्कादायक!! एकाच महिलेला एकाच वेळी दिले कोरोना लसीचे तीन डोस!

 

 

 

lead storyration card