लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
वृत्तसंस्था :26 फेब्रुवारी
दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाची आज संध्याकाळी 4.30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. आज पत्रकार परिषदेत पश्चिम बंगाल, तामिळनाडू, पुद्दुचेरी, आसाम आणि केरळ या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. दोन दिवसापूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाची एक बैठक पार पडली. गेल्या दोन महिन्यांपासून निवडणूक आयोगाची पथकं या पाचही राज्यांच्या वारंवार दौऱ्यावर होते. या पथकांनी रिपोर्ट्सही तयार केले आहेत. राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे जाऊन काही मागण्याही केल्या आहेत. खासकरून बंगालमध्ये भाजपने सेंट्रल फोर्सची मागणी केली होती. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत काय घोषणा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.