विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी समोर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

२०२४ मधील महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला तब्बल 230 जागा मिळून स्पष्ट बहुमत मिळालं आहे. १३२  जागा मिळवून  भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला.  तर शिवसेना शिंदे गटानं 57 जागांवर विजय मिळवला. दरम्यान राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर  विधानसभेची  पहिलीच  निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीमध्ये सर्वांचं लक्ष लागलं होतं, लोकसभेत राष्ट्रवादी अजित पवार गटाला फारसं यश मिळालं नव्हंत, मात्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटानं तब्बल 41 जागांवर विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ दहा जागांवर समाधान मानावं लागलं. या निवडणुकीनंतर अजित पवार हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांची आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेपूर्वी दिल्लीतील प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अजित पवार यांच्याकडून दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत देण्यात आले आहेत. तसेच लवकरात लवकर आपला पक्ष राष्ट्रीय बनेल असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे.

त्यापूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचेकडून  दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेले  आहेत. राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवायची आहे. दिल्लीत आपला नक्की विजय होईल,  राष्ट्रवादीचा  राष्ट्रीय पक्षाचा गेलेला दर्जा आपण पुन्हा  मिळून देऊ असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.  त्यामुळे आता राष्ट्रवादी अजित पवार गट दिल्ली विधानसभेची निवडणूक लाढण्याची शक्यता आहे.

ईव्हीएमवरून अजित पवार यांनी विरोधकांना खोचक टोला लगावलेला आहे. लोकसभा निवडणुकीत   यश मिळालं तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं आणि आता विधानसभा निवडणुकीनंतर त्याच्यामध्ये घोटाळा झाला असं विरोधक म्हणतात असा टोला यावेळी अजित पवार यांनी लगावलेला आहे.