लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे बारामतीचा गड जिंकण्यासाठी मैदानात उतरले आहेत. गावोगावी जात त्यांनी आपल्या तडाखेबंद भाषणांनी आणि रोखठोक स्वभावाने रंगत आणली. लोकसभेला पवार साहेबांना साथ दिली. आता मला विधानसभेत पाठवा असे आवाहन त्यांनी केले. गावोगावी जाऊन त्यांनी मतदारांना भावनिक साद घातलीच. पण त्याचवेळी अखरेच्या टप्प्यात त्यांनी युगेंद्र पवार आणि काकीवर पण निशाणा साधला. त्यांनी आता अजून एक मोठा पत्ता टाकला आहे. काही दिवसांपूर्वी रासपचे महादेव जानकर यांनी जाहीर सभेत जे वक्तव्य केले होते. तोच मुद्दा स्वत: अजितदादांनी हिरारीने मांडला आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची चूल सध्या महायुतीच्या वाड्यात आहे. एक आठवड्यापूर्वी त्यांनी बारामती मतदारसंघातील काटेवाडी कण्हेरी येथे जोरदार भाषण केले. त्यात त्यांनी सत्ता केंद्र पवार कुटुंबियातच कसे असा सवाल केला होता. अजित पवार बाजूला झाल्यानंतर शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली. त्यावर त्यांनी शरद पवार यांनी पवार सोडून इतर कुणाला का उमेदवारी दिली नाही? असा सवाल केला होता.
पूर्वी आमदार झालो त्यावेळी याठिकाणी काय होत व आता काय परिस्थिती आहे, त्यामुळे तुम्ही विचार करून मला साथ द्या, असे आवाहन अजितदादांनी केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाचा माळेगांवच्या सभेला महिला आल्या आहेत. तुम्हाला पैसे देऊन आणलं का? कारण दोन दिवसापूर्वी पैसे देऊन सभेला आणलं गेलं. असं कधीच आजपर्यंत झालं नव्हतं मात्र ही पद्धत अतिशय चुकीची आहे, माळेगांव मधील काही पुढारी चुकीचं काम करतायत मी तुम्हाला सांगतो तुम्हाला तसं करायच असेल तर उघड करा. अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. मी उद्या सभा घेणार आहे. ते पण सभा घेणार आहेत ते त्यांचा विचार मांडतील मी माझा विचार मांडणार आहे पुढच्या पिढी साठी कुणाला साथ द्यायची हे ठरवा, असे आवाहन अजितदादांनी मतदारांना केले.
पवार साहेब रिटायर झालेनंतर मग बारामतीकडे कोण लक्ष देणार साहेबाचा आदर राखून लोकसभेला ताईंना साथ दिली. आता मला साथ द्या मी न मागता सगळं करतोय याची तुम्हाला किंमत कळत नाही विनंती करणे माझं काम आहे. मतदार म्हणून निर्णय तुमचा आहे, अशी भावनिक साद दादांनी घातली.
दरम्यान शरद पवार यांच्या नवीन नेतृत्व तयार करत असल्याच्या वक्तव्यावर अजितदादांनी प्रतिक्रिया दिली. पवारांशिवाय दुसर्या कुणाला संधी आहे की नाही, असा सवाल त्यांनी केला. शरद पवार यांनी सांगीतलं की तीस वर्षांपासून अजितला संधी दिली. मग बारामतीत पवारांशिवाय दुसरं कोणी नाही का? आयुष्यभर पवारच उभे राहतील का? बाकीच्यांनी काय गोट्या खेळायच्या का? असे अजितदादा म्हणाले. यावरून अखेरच्या टप्प्यात अजितदादांनी मोठं कार्ड खेळल्याचं दिसून येते.