अजित पवार यांचा रवी राणा यांच्यावर निशाना त्यांच्या बोलण्यामुळे तो स्वत:च्या पत्नीच्या पराभवास जबाबदार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

विधानसभा निवडणूक – २०२४  करिता २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. त्याकरिता विविध पक्षाकडून जोरदार प्रचार सुरु आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रवी राणांनी अमरावतीची एक जागा निवडून आली नाही तर काही होत नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे महायुतीचे घटक असलेल्या रवी राणांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी चांगलेच फटकारल्याच पाहायला मिळालं.  विनाशकाले विपरित बुद्धी. याबद्दल न बोललेलं बरं अस वक्त्यव्य केल.

त्याच्या या बोलण्यामुळे तो स्वत:च्या पत्नीच्या पराभवाला कारणीभूत ठरला. लोक काहीही बोलत असतात. प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचं नसतं. लोकांना फार नकारात्मक बोललेलं आवडत नाही. जनता सकारात्मक विचार करत असते. मी पण विधानसभेला दोनदा रवी राणाच समर्थन केल. काय बोलावं हा त्याचा अधिकार आहे. आम्ही चांगल्या मताधिक्क्याने विजयाचा प्रयत्न करणार. देवेंद्र फडणवीसांनी आनंदराव अडसूळ यांना  योग्य पद्धतीने समजावलं पाहिजे ते रवी रानाच्या विरोधात काम करतोय. हे बरोबर नाही.  त्यामुळे  महायुतीत कुठेही अंतर पडणार नाही. कारण नसताना गैरसमज निर्माण होणार नाही ही काळजी घेतली पाहिजे. वाचाळवीरांनी वाचाळपणा बंद केला पाहिजे असं अजित पवार म्हणाले.

 

सुद्धा अजित पवार बोलले.