पक्ष उभा करायला अक्कल लागते, मात्र फोडायला अक्कल लागत नाही”, शरद पवारांची देवेंद्र फडणवीस यांचेवर घणाघाती टीका.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,    

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची आज अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे प्राजक्त तणपुरे यांचे  प्रचारासाठी प्रचारसभा पार पडली. त्यावेळी शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, पक्ष फोडायला अक्कल लागत नाही”, अशा शब्दांत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना  टोला लगावला. यावेळी त्यांनी आमदार प्राजक्त तणपुरे यांचं देखील कौतुक केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 30-40 आमदार गोळा केले. गुवाहाटीला जाऊन बसले. ही एक व्यक्ती देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होती व  उद्धव ठाकरेंच्याहि  मंत्रीमंडळात होती. असं असतानाही त्यांनी पक्ष फोडण्याची भूमिका घेतली.  देवेंद्र फडणवीसांनी सगळ्यात मोठं काम काय केलं असे विचारल्यावर ते  पक्ष फोडला म्हणून सांगतात.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी राहुरीला आलो होतो. तुम्ही महाविकास आघाडीचा  उमेदवार निवडून दिला त्याबद्दल तुमचे आभार. मागच्यावेळी काँग्रेसचा एक आणि आमचे चार खासदार होते. मात्र घटना धोक्यात असल्याने तुम्ही आमचे 31 खासदार निवडून दिले. आता भाजप आणि  आमच्यातल्या फुटून गेलेल्या लोकांचे राज्य आहे. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवारांसह अनेकजण मंत्री होते. मात्र शिंदेंनी काही लोक घेतले आणि गुहाटीला जाऊन बसले. उद्धव ठाकरेंचे सरकार पाडले. पक्ष फोडून सत्ता मिळवणे ही लोकशाही नाही.  पक्ष फोडल्याचे देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणाले. पक्ष उभा करायला अक्कल लागते. मात्र फोडायला अक्कल लागत नाही”, असा पुनरुच्चार शरद पवार यांनी केला.

ज्या महाराष्ट्रात कॉंग्रेसचा 1 खासदार, राष्ट्रवादीचे 4 खासदार होते. तुम्ही आम्हाला 48 पैकी 31 खासदार दिले, राष्ट्रवादीला 8 खासदार दिले. लोकसभेच्या निकालानंतर सत्ताधारी पक्षाची  चिंता वाढली. त्यामुळे त्यांनी नवनवीन योजना आणल्या. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर यांनी काही योजना राबवल्या. मात्र आज महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत. महाराष्ट्रात अनेक बहिणींचा पत्ता लागत नाही आणि तुम्ही लाडक्या बहिणी म्हणता. आज महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात 1100 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. शेतकऱ्यांच्या हाताला आलेलं पीक वाया गेलं, शेतकऱ्याला कर्ज फेडता आलं नाही. पीकाला भाव मिळाला नाही.  विष पिलं आणि आत्महत्या केली. त्यामुळे भाजपला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही”, अशी टीका शरद पवारांनी केली.

“प्राजक्त तनपुरेसारखा जानकार, अभ्यासू आमदार तुमच्याकडे आहे. कमी काळ मंत्री होते. मात्र त्यांनी काम चांगल केलं. प्राजक्त तनपुरेसारखा मंत्री दिला तो आमच्यापासून टोकाला आला आणि आमचे सगळे प्रश्न सोडवले. जे जे काम आम्ही घेऊन गेलो, नम्रपणे वर्तवणूक करतो, याचा आनंद आहे असं ते बोलले. मला अभिमान आहे प्राजक्त तनपुरेंने जनतेसाठी कामं केली. पुन्हा एकदा प्राजक्त तनपुरेला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा. तसेच . पहिल्या निवडणुकीत त्यांच्या कामाची पद्धत ओळखली. महाराष्ट्राची सत्ता आम्हाला दिली तर प्राजक्त तनपुरे राज्यासाठी काम करतील असे  शरद पवार यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या मंत्रिपदाचे संकेत सुद्धा  दिले.