रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामींच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटील भडकले.पोलीस आजपर्यंत झोपले होते का ?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई डेस्क:– पनवेल पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे प्रमुख अर्णव गोस्वामीं यांना अटक केल्या प्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तीव्र संताप करत  भडकले . सदर प्रकरण 2018 चे असून  अर्णव गोस्वामी यांना आता अटक करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांना अर्णव गोस्वामी प्रकरणी राज्य सरकार आणि पोलिसांना धारेवर धरले आहे. भारतातील नामवंत पत्रकार अर्णब गोस्वामी यांना इतर कोणत्याही प्रकरणात अडकावता येणार नाही म्हणून एका वास्तुविशारदाच्या आत्महत्या प्रकरणी अडकवण्यात येत आहे. 2018 सालीच ही केस बंद झाली होती. ती केवळ आणि केवळ सुडाच्या भावनेने पुन्हा उघडली गेली आणि त्यांना अटक करण्यात आली. भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी घटना आज घडली आहे. मी भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि त्याहून आधी एक भारतातील नागरिक म्हणून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

राज्यातील जनतेने मोर्चा काढावा, उपोषण करावं आणि आंदोलने करावी..

भाजप कार्यकर्त्यांनी आणि राज्यातील जनतेने अर्णव गोस्वामीं यांना अटक केल्या प्रकरणी मोर्चा काढावा, उपोषण करावं आणि आंदोलने करावीत, असं आवाहनही त्यांनी केलं. या शिवाय सोशल मीडियावरूनही आवाज उठवण्याचं आवाहनही केलं आहे.राज्यात हुकूमशाही लागू करू शकतो असं या सरकारला वाटत आहे. पण महाराष्ट्रात हा प्रकार कदापिही खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

chandrakant dada patil