वाघाच्या हल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

ताडोबाच्या बफर क्षेत्रातील घटना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

चंद्रपूर, दि. ३ फेब्रुवारी : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प बफर क्षेत्रातील सितारामपेठ गावानजीकच्या शेतशिवारात  वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

प्राप्त माहितीनुसार, मृतकाचे नाव धांडे (५०) असे आहे. मृतक धांडे जनावरांसाठी हिरवा चारा आणण्यासाठी शिवारात गेले असता जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहीती मिळताच वनविभागाचा पथकाने घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा मोकापंचनामा करण्यात आला सून प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.

हे देखील वाचा : 

अल्पवयीन मुलीच गर्भपात प्रकरण : डॉ. कदम यांच्या कारनाम्यानंतर मंत्रालय अलर्ट

परळी – बीड – नगर रेल्वे मार्गावर प्रवाशी घेऊन रेल्वेचे चाचणी

 

lead news