मोठी बातमी: रायगडमध्ये भीषण दुर्घटना, दरड कोसळून तब्बल ३८ जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील तळई गाव दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेल्याने ३८ जणांचा मृत्यू झालेला आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

रायगड : जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळई गावात पावसाने हाहाःकार उडवला असताना मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून तब्बल ३८ जणांचा मृत्यू झाला आहे.  पावसामुळे ३५ घरांवर दरड कोसळल्याने ८० ते ८५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जातआहे. या भीषण दुर्घटनेनंतर NDRF कडून बचावकार्य सुरु आहे.

गेल्या आठवड्याभरापासून महाडमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळई गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली ३५ घरे दबली गेली.

दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून ३६ जणांचे मृतदेह बाजूला काढले. तर ८० ते ८५ जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.

दरम्यान, एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासनाकडून कोणीही आलेलं नाही, अशी तक्रार इथल्या ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे जखमींवर त्वरित उपचार करावा, अशी मदतीची याचना स्थानिक करत आहेत.

रायगडमधल्या पूरस्थितीचा मुख्यमंमंत्र्यांडून आढावा

महाड येथील पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून माहिती घेतली. महाड मधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे, मात्र अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टर मधील बचाव पथकाला ते दिसतील असे आवाहन प्रशासनाने केले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी यांनी दिली.

 हे देखील वाचा :

जनविरोधी धोरणांच्या विरोधात लढा तीव्र करणार : तिसऱ्या आघाडीची गडचिरोली बैठक

स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांच्या १९.९६ लाखांच्या थकित कर्जाची भाजपकडून परतफेड; लोणकर कुटुंबीयांना मोठा दिलासा

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या आस्थापनेवर GD कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 25271 जागांसाठी मेगाभरती

lead storyraigad news.