लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सांगली डेस्क :- राज्यात प्राध्यापक आणि प्राचार्यांच्या भरतीला आघाडी सरकारने स्थगिती दिली असा खोटा प्रचार सध्या सुरू आहे, असा आरोप उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केला. सध्याची निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल,असे सांगून सामंत म्हणाले, कोवीड सुरु झाल्यावर एक अधिवेशन होऊ शकते नाही, त्यामुळे तांत्रिक अडचणी आल्या. याचा अर्थ आम्ही भरतीला स्थगिती दिली, असा होत नाही.
अर्थकारण आणि बेरोजगारी हे प्रश्न बिकट बनले आहेत, तेव्हा ते सोडवायला प्राधान्य दिले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील प्रचारासाठी सांगली येथे झालेल्या संयुक्त प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री जयंत पाटील होते. राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.