बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपूर, दि. ३ डिसेंबर : राजुरा तालुक्यातील आनंदगुडा (लक्कडकोट) येथे आज सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास बिबट्याने शेतकऱ्यास ठार केल्याची घटना घडली आहे. हि राजुरा तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची महिनाभरातील दुसरी घटना आहे. ६ नोव्हेंबर तुम्मागुडा (सुब्बई) येथील शेतकऱ्यास बिबट्याने ठार केले होते.
सदर शेतकऱ्याचे नाव जंगु मारु कुरसंगे (५८) असे असून त्याच्या पश्चात पत्नी व २ मुले असा आप्त परिवार आहे. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली असून वनविभागाविरोधात नागरिकांत प्रचंड रोष दिसून येत आहे. घटनास्थळी वनविभागाची चमू दाखल झाली असून पुढील कार्यवाही सुरु आहे.
हे देखील वाचा :
Comments are closed.