Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कल्परुक्ष – मोह झाडाचा प्रत्येक भाग गुणकारी; मुख्य वनसंरक्षक डॉ किशोर मानकर

संयुक्त वनव्यवस्थापन समिती पळसगाव पाथरगोटा च्या वतीने वनमोत्सव संपन्न.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
भारतात आदिवासींना रोजगार देणारे झाड म्हणजेच मोह होय. इतर अनेकांसाठी हे फक्त एक झाड म्हणून गणले जाते परंतु आदिवासी लोकांसाठी हे झाड ‘मोठा देव’ आहे. याच झाडाच्या खाली ‘मुटम्या देव’ किंवा मोठा देव मांडला जातो. मोहाच्या झाडाची मूळं, फांद्या आणि खोड इंधन म्हणून वापरला जातो, कुऱ्हाडीच्या एकाच घावात मोठ्या लाकडाचे सुद्धा दोन उभे तुकडे होतात, जाळण्यासाठी मोहाच्या झाडाचा सगळ्यात जास्त होतो, हा लाकूड लवकरच फुटतो आणि लवकरच जळतो म्हणून इंधन म्हणून मोहाचा सगळ्यात जास्त वापर होतो. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात धानाची शेती खूप आहे, या सर्व लोकांच्या घरी विशेषता शेतकरी, पाटलांच्या घरी बैलांना पाणी पिण्यासाठी मोहाच्या लाकडाच्या डोंग्या बनवले जातात, हीच स्थिती बालाघाट कडे पाहावयास मिळते. मासेमारीसाठी लागणारा डोंगा मोहाच्या लाकडाचा असतो, आणि सोनार मोहाच्या कोळशावर सोने, चांदी ठेवून नळीने फुंकर घालीत असतो, लोहार तर नांगर पाजवताना मोहाचेच कोळसे घेऊन या असे आवर्जून सांगतो.

आरमोरी दि, १ जुलै  : आदिवासींचा कल्पवृक्ष असलेल्या मोहाच्या फुला-फळांपासून भाकरीची सोय होईल इतपत पैसे मिळत असल्याने हे झाड आदिवासींसाठी वरदान ठरते आहे. सध्या उन्हाळा सुरू झाला असून वनौषधी वृक्षांना बहर आला आहे. मोह हा मधुक गोत्रातील पानगळीचा मोठा वृक्ष. जंगलात व वनप्रदेशानजीक राहणाऱ्या आदिवासींसाठी हा वृक्ष वरदान ठरला आहे. झाडाला नैसर्गिकरीत्या फुल येतात फळ लागतात. बि पळतो पाऊस येतो अंकुर येतात आणि झाडे तयार होतात .आपल्या वसुधरेत मानवाची सख्या वाढली आहे. आपल्या बुध्दीच्या जोरावर आपण सर्व झाडे लावतो मोठ्या नद्या अडवतो युक्तीने वाघ पकडतो पण आपण आपल्या बुद्धीच्या उपयोग आपण चांगल्या कामासाठी केल तर चागल होत पण आपण हवसेपोटी ,लालसे पोटी निसर्ग नष्ट करायला लागलो.परतु यात निसर्ग आपल्याला अनेक गोष्टी देतात यात माझ्या मनात आला की आपल्या वनात, जगलात खाली जागा पडलेली आहे तिथे आपण मोहाचे झाडे लावले तर दहा वर्षांनंतर ते शंभर वर्षांपर्यंत एक एक मोहाच्या झाडाचा उत्पन तिन ते चार हजार गावकऱ्यांना मिळु शकतो त्यामुळे मोहाच्या झाडाचा प्रत्येक अवयव आपल्या कामांचा असल्यामुळे त्यांचे चांगल्या प्रकारे संवर्धन करा असे प्रतिपादन गडचिरोली वनवृत्ताचे वनसरक्षक डॉ किशोर मानकर यांनी केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा येथील पाझर तलावा जवळ संयुक्त वनव्यवस्थापन समिती पळसगाव पाथरगोटा यांच्या वतीने वन महोत्सवात अध्यक्षिय स्थानावरुण वनसंरक्षक डॉ किशोर मानकर बोलत होते .प्रमुख अतिथी म्हणून देसाईगंज उपवनसंरक्षक धर्मविर सालविठ्ठल ,देसाईगंज सहायक उपवनसंरक्षक धनविजय वायभासे ,कुरखेडा उपविभागीय अधिकारी मा.मनोज चव्हान ,आरमोरी वनपरीक्षेत्र अधिकारी अविनाश मेत्राम ,सरपंच जयश्री दडमल ,पळसगाव संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष मोहन मडावी ,पाथरगोटा संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीकृष्ण प्रधान, श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्था जोगीसाखरा अध्यक्ष दिलीप घोडाम, वनहक्क समिती अध्यक्ष मोरेश्वर मेत्राम, सचिव आनंदराव राऊत, डॉ राऊत मान्यवर उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या प्रसंगी पुढे वनसरक्षक डॉ किशोर मानकर यांनी झाडे लावा वनांचे संरक्षण करा या पासुन आपल्याला आक्सीजन मिळुन आरोग्य सुधरुड राहण्यास मदत होते असेही सांगितले यात देसाईगंज उपवनसंरक्षक धर्मविर सालविठ्ठल यांनी एका व्यक्तींचे मांगे निसर्गाचे संतूलन राखने खरीता २५००झाडे पाहीजे थे संतुलन राखने करीता वृक्ष लागवड व त्यांचे संरक्षण संवर्धन करणे काळाची गरज आहे. त्याकरीता जनतेने पुढाकार घेऊन ते करायला पाहीजेत असे आव्हान केला,डाॅ रामकृष्ण राऊत समाज सेवक यांनी वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे या तुकडोजी महाराजांचे संदेशाचे कथन करून लक्ष हे मानवाचे सोयरे आहेत त्यांचे संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी आपली आहे याचे स्मरन करून दिले.

कार्यक्रमाची प्रस्तावना मा.अविनाश मेश्राम यांनी करताना सांगीतले की मोहा वृक्ष लागवडीची संकल्पना हि मा.डाॅ.किशोर मानकर वनसंरक्षक यांची असुन वनमहोत्सव निमीत्त  आज साकार करण्यात आल्याचे सांगीतले.सदर कार्यक्रमाचे संचालन एम.गाज़ी शेख क्षेत्रसहाय्यक वनपरिमंडळ पळसगांव यांनी तर आभार प्रदर्शन कु.प्रीया करकाडे वनरक्षक पळसगांव यांनी केला. सदर कार्यक्रम यशस्वी कु.रूपा सहारे वनरक्षक पळसगांव ,केवळरामजी प्रधान,शंकरजी नखाते,देवचंद दोनाडकर,अशोक भोयर,शारदा लोखंडे,ज्योती खेवलेव त्यांची टीम,तसेच जोगीसाखरा येथील सर्व वनमजूर यांनी प्रयत्न केला.

Comments are closed.