लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वर्धा, दि. २७ मे : वर्ध्यात कारंजा तालुक्यातील राहटी जंगल बिट मध्ये तेंदूपत्ता आणायला गेलेल्या इसमाला तीन वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने गावात सर्वत्र खळबळ उडाली आहे.
नांदोरा येथील मुकुंद ढोके (५८) हे आज पत्नी मुलांसोबत जंगलात तेंदूपत्ता आणण्यासाठी गेले होते. वडील काही अंतरावर गेले असता त्यांच्यावर तीन वाघांनी हल्ला केला. वडील आवाज देऊनही येत नसल्याने मुलाने गावातील नागरिकांना बोलावून आणले. जंगलात पाहणी केली असता वाघ वडिलांना ओढत नेताना दिसले. यात मुकुंद ढोके यांचा जागीच मृत्यू झालाय.
घटनेची माहिती प्राप्त होताच वनविभागचे अधिकारी, पोलीस प्रशासन पोहचून पंचनामा करण्यात आला. यावेळी तातडीचे एक लाखाची मदत मृतकाच्या नातेवाईकांना वनविभागकडून देण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. गायनेर यांनी सांगितले.