३१ डिसेंबरला हे सरकार पडणार म्हणजे पडणार ; आदित्य ठाकरे यांचा दावा

सावंतवाडीत खळा बैठकीनंतर त्यांनी हे मोठं विधान केलं आहे..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वृत्तसंस्था २३ नोव्हेंबर २०२३ :  राज्याचे माजी मंत्री, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारबाबत मोठं विधान केलं आहे. येत्या ३१ तारखेपर्यंत किंवा त्या आधी विधानसभा अध्यक्षांनी निकाल द्यायला हवा. तसेही या सरकारला जास्त दिवस राहिले नाहीत.

३१ डिसेंबरला हे सरकार पडणार म्हणजे पडणार आहे. २०२४ ला देशात आणि महाराष्ट्रात नवीन सरकार बसणार आहे, असा मोठा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. सावंतवाडीत खळा बैठकीनंतर त्यांनी हे मोठं विधान केलं आहे.

हे देखील वाचा ,

अहेरीत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे भीक मांगो आंदोलन

आदित्य ठाकरे