लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आलापल्लीत मुख्य मार्गावर असलेल्या पी.डब्लू. डी ऑफिसच्या बाजूला असलेली नाली ठरत आहे व्यावसायिक लोकांसाठी डोकेदुखी. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मुख्य मार्गा लगत असलेल्या नालीची ग्रामपंचायत आलापल्ली कडून साफ करण्यात आली नसल्याने ही नाली कचऱ्याने व घाणीने तुडुंब भरून आहे.
त्यामुळे साचलेल्या पाण्यात डेंगू मलेरिया चे मच्छर तयार होत असल्यामुळे येथें राहणाऱ्या व्यावसायिक लोकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.कित्येक वेळा ग्रामपंचायत प्रशासनाला सांगूनही नाली साफ करण्याकडे ग्रा.प प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे.