लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई 30 सप्टेंबर :- काही मुले टीव्हीवर काही पाहून किंवा वाचून त्याप्रमाणे स्टंट किंवा चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. सध्या मुले पळवणारी टोळी सक्रिय झाल्याच्या अफवांनी पालकांचा जीव टांगणीला लागलेला असतानाच परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे स्वत:च्याच अपहरणाचा बनाव एका विद्यार्थ्याने रचल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.
घाटकोपर परिसरात राहणाऱ्या एका ११ वर्षीय मुलाने प्रताप केला. त्या मुलाची नुकतीच परीक्षा संपली, मात्र परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे शिक्षकांनी ओरडण्यास सुरुवात केली. अशातच अपहरणाचे ऐकून त्याने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला. बुधवारी सकाळी शाळेत जात असताना आपल्याला दोघांनी रिक्षात कोंबून तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी झटापट करत पळ काढून शाळा गाठली असे त्याने शाळेत सांगितले. शाळेने घाटकोपर पोलिसांत तक्रार दखल केली.
पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासले, शेकडो रिक्षाही तपासल्या. मुलाच्या जबाबात सतत बदल होत असल्याने पोलिसांना संशय आला. त्यांनी त्याला विश्वासात घेत चौकशी करताच त्याने अपहरणाचा बनाव केल्याचे पोलिसांना सांगितले.
हे पण वाचा :-