वर्धा दि . ०५ जानेवरी :- महाराष्ट्रावर औरंगजेबाने अत्याचार केलेत. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासाठी बैठक घ्यावी आम्हाला बोलवावे आम्ही बैठकीला येतो. आम्ही औरंगजेबाची औलाद नाही तर संभाजी राज्यांची औलाद आहोत अशी टीका भाजपचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर केली आहे.
कॉग्रेसने यापूर्वी पांडेचारी, बंगलोर आणि अनेक शहराची नावे बदलली आहेत. देवळी येथे शेतकरी संमेलनासाठी सुधीर मुनगंटीवार वर्ध्यात आले होते. यावेळी प्रतिक्रिया देतांना त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. याशिवाय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर देखील त्यांनी टीका केली.
बाळासाहेब थोरात यांनी आपले विजय नाव बदलवून बाळासाहेब केले असल्याचे त्यांनी सांगितले. मग औरंगाबाद या शहराचे नाव बदलण्यासाठी काँग्रेस चा विरोध का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.