निवडणूक आयोगाने देशाची लोकशाही गोठवली – कपिल सिब्बल.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर :- निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह तात्पुरता स्वरुपात गोठवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेची भूमिका मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे.

“निवडणूक आयोगाने फक्त शिवसेनेचं नाव आणि चिन्हंच गोठवलं नाही, तर देशातील लोकशाहीदेखील गोठवली आहे. ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आहे. तर, संधीसाधू लोकांचा शिंदे गट हा भाजपाची सेवा करणारा गट आहे”, अशी प्रतिक्रिया कपिल सिब्बल यांनी दिली आहे.

निवडणूक आयोग हे फक्त स्वतंत्र असल्याचं दाखवते. मात्र, ते केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करतात, अशा संस्थेची लाज वाटते”, असेही सिब्बल म्हणाले.

हे देखील वाचा :-  

टाकीगावच्या चिरनेर रस्त्यावर भीषण अपघात .

समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचे दीर्घ आजाराने निधन

delhikapil sibalMaharashtra Political Crisispoliticsshivsena