लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपूर, दि. ३१ मार्च : चंद्रपूरचा पारा आजही चढताच राहिला आहे. आज चंद्रपुरात ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या ५० वर्षात मार्च महिन्यात एवढ्या उच्चांकी तापमानाची प्रथमच नोंद झाल्याची माहिती अभ्यासकांनी दिली आहे.
मार्च महिना संपण्याच्या आधीच दोन उष्णतेच्या लाटा धडकल्याने नागरिकांची लाही लाही होत आहे. दुपारच्या वेळेस चंद्रपुरातील रस्ते निर्मनुष्य होत आहेत. आता याच काळात महिनाभरासाठी शाळा सुरू होणार असल्याने पालक वर्गात चिंता व्यक्त होत आहे. उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी नागरिक हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहेत.
हे देखील वाचा :