उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीची ताकद दाखवण्यासाठी सभासदांची संख्या जास्त करा – जयंत पाटील यांच वक्तव्य

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई डेस्क, दि. २७ ऑगस्ट : आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी ची आघाडी होणार आहे यासाठी आपल्याला प्रत्येक तालुक्यात सभासद संख्या अधिक करावी लागणार आहे जर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सभासद संख्या अधिक असल्याचं आपल्याला त्याठिकाणची जागा मागता येणारे नाही यासाठी राष्ट्रवादीची ताकद दाखवावी लागेल अस वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्येक्ष जयंत पाटील यांनी जळगावात घेतलेल्या पक्ष मेळाव्यावेळी केली.

जयंत पाटील यांच्या या वक्तव्यावरून आगामी महापालिका ,जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुकीत ज्या पक्षाची जास्त ताकद त्याचं पक्षाच्या कार्यकर्त्यांना तिकीट देण्यात येतील असं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच सूत्र ठरलं तर नाही ना अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

हे देखील वाचा : 

मी जेल मध्ये जाणार असल्याच्या तारखा दिल्या जात आहे :- एकनाथ खडसे

धक्कादायक! पोलीस हवालदाराची गळफास घेत आत्महत्या! 

jayanti patillead newsuddhav thackeray