लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
वाशीम, दि. २६ फेब्रुवारी : शासन मुलीचे विवाहाचे वय २१ वर्ष करण्याच्या विचारात असतांना सद्या असलेला १८ वर्षे वयाचा निकषही पायदळी तुडवत वाशिम जिल्ह्यात मोठ्या थाटात बालविवाह संपन्न होत आहेत हे भयाण वास्तव आहे.
अल्पवयीन मुलीच्या लग्नाच्या प्रयत्नामुळे बालविवाह समस्येचे गांभीर्य वाशीम जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. खरं तर बालविवाह होऊ नये, यासाठी शासनाचे कडक कायदे आहेत. बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार दोषींना दोन वर्षांपर्यंत शिक्षा आणि आर्थिक दंड होऊ शकतो. परंतु, या कायद्यांना न जुमानता लपूनछपून बालविवाह करण्याचे प्रमाण व बालविवाह तत्परतेने थाबवण्याचे प्रमाण वाशीम जिल्ह्यामध्ये वाढतच आहे.
वाशिम येथुन अवघ्या ५ किमी अंतरावर असलेल्या काटा या गावी एक १४ वर्षीय कोवळ्या बालिकेचा बालविवाह लावून देण्यात येणार असल्याची गुप्त माहिती चाइल्डलाइनच्या टोल फ्री क्रमांक १०९८ वर मिळाली होती. त्यावरून जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांना पत्राद्वारे माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन बालविवाह थांबवण्याचे आदेश दिले. त्यावरून जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी या गावातील लग्न घरी जाऊन समुपदेशन करून कायद्याविषयी माहिती देऊन हा बालविवाह रोखण्यात आला, लग्न १८ वर्षे पूर्ण झाल्यावरच करणार असे हमीपत्र कुटुंबियांकडून लिहून घेण्यात आले.
हे देखील वाचा :