मुंबईचा येत्या दोन-अडीच वर्षांत कायापालट करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 19 जानेवारी :-  आज मुंबईमध्ये मेट्रोचं  उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विकासकामांचा पाढा मोदींसमोर वाचला. तसेच मोदींवर देखील स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. यावेळी त्यांनी दावोसमध्ये घडलेला एक प्रसंग सांगत मोदींची स्तुती केली.महाविकास आघाडी सरकारच्या काळाता महाराष्ट्राचा विकास किती झाला हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ठप्प झालेल्या कामांना चालना देण्यासाठी आणि लोकोपयोगी योजनांचा श्वास गुदमरला होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य धाडसी नेतृत्वामुळे आम्हाला या राज्याची आणि मुंबईची त्यातून सुटका करण्याची संधी मिळाली.

मी जेव्हीही पंतप्रधान नरेंद्र मोदीं बघतो आणि त्यांना भेटतो तेव्हा माझ्या मानात एक पवित्र भावना जागी होते. त्याच्या व्यक्तिमत्त्वात काही खास आहे, जे आम्हाला विश्वास आणि उर्जा देते. मुंबईकरांचं जगणं सुसय्य करण्याची सुरूवात खऱ्या अर्थाने आज झाली आहे. येत्या दोन अडीच वर्षात या मुंबईचा कायापालट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसाची सुरूवात सुवर्ण अक्षरात नोंद करावी अशी ठरेल.

हे पण वाचा :-

MetromumbaiMumbai development