लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी ३१ ऑगस्ट: अहेरी वि.स.क्षेत्र बसपाच्या वतिने आलापल्ली येथे बहुजन समाज पार्टी अंतर्गत एक दिवसीय शिबीर म्हणजेच कँडर कँम्पचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रा.रामटेके यांची उपस्थिती होती .तर उद्घाटक शंकर बोरकुट जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते झाले.
प्रमुख अतिथी ,गणपत तावाडे जिल्हा प्रभारी,कैलास कोंडागुर्ला बि.व्ही.एफ.जिल्हा सहसंयोजक,खुशाल डोंगरे ,वि.स.क्षेत्र अध्यक्ष,उपस्थित होते.
प्रा.रामटेके मार्गदर्शन करताना म्हणाले , यावेळी समाजाच्या मुळ समस्या अल्पजाती,अल्पजन, जाती धर्माच्या आधारावर ५००० वर्षापासुन गुलाम ठेवले.म्हणुन बहुजन समाज जागृत बनवण्यासाठी संघटन,आंदोलन,निवडणुका,या तीन गोष्टाची आवश्यकताअसते, तसेच आम्हाला भुक ज्ञानाचि लागली पाहिजे, पोटाची भुक लागता कामा नये, बसपा सत्तेत जर आलं तर संविधानात ,घोषणापत्रात जे बाबासाहेब लिहुन ठेवले आम्ही तेच करू असे प्रतिपादन केले.
आदिवासी वक्ता सेडमाके यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले ,आदिवासी साठी असलेल्या विविध योजनेची अंमलबजावणी झाली नाही, जर अंमलबजावनी झाली असती तर आदिवासिंचा विकास झाला असता
प्रास्ताविक खुशाल डोंगरे तर संचालन कैलास कोंडागुर्ला ,आभार प्रितम झाडे वि.स.क्षेत्र बि.व्ही.एफ संयोजक यांनी केले.नारायण अलोणे वि.स.कोष्याध्यक्ष,सौजन्या कोवे महिला आघाडी,हेमंत कुलसंगे वि.स.उपाध्यक्ष,महादेव करमरकर एटापल्ली तालुका अध्यक्ष,राजेश्वर वाघाडे,नामदेव डोंगरे,मुकंद दुर्गे वि.स.सचिव ,आदी जिल्हा,वि.स,बी व्ही एफ सेक्टर बुथ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.