Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर जिल्ह्यात आज दोन मृत्यू मृत्युसह २१२ जण कोरोना बाधित तर १२५ कोरोनामुक्त

  • आतापर्यंत २४,५४२ जणांची कोरोनावर मात 
  • ॲक्टीव पॉझिटिव्ह १७४२

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

चंद्रपूर, दि. २६ मार्च : जिल्ह्यात मागील २४ तासात १२५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर १२५ कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन  बाधितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २६ हजार ७०१ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २४ हजार ५४२ झाली आहे. सध्या १७४२  बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख ६५ हजार ९६२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख ३४ हजार ५०१ नमुने निगेटीव्ह आले आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

            आज मृत झालेल्यामध्ये  पंचशील वार्ड, गोंडपिपरी येथील ५६ वर्षीय पुरूष व म्हाडा कॉलनी येथील ८२ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४१७ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३७८, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या २१२ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील ७०, चंद्रपूर तालुका १४,  बल्लारपूर १३, भद्रावती १८, ब्रम्हपुरी ४, नागभिड १२, सिंदेवाही सहा, मूल नऊ, सावली ३, गोंडपिपरी १, राजूरा ४, चिमूर १७, वरोरा १, कोरपना ४ व इतर ठिकाणच्या २ रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Comments are closed.