Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरीला नगरपरिषदेचा दर्जा द्या, वेळप्रसंगी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू – भाजयुमो जिल्हा महामंत्री अमोल गुडेल्लीवार यांची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. ६ मार्च: अहेरी शहराला तात्काळ नगरपरिषदेचा दर्जा देण्याची मागणी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री अमोल गुडेल्लीवार यांनी अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी सोनप्पा यमगर यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.     

         अहेरी शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, अहेरीतील जनतेला उत्तम मूलभूत सोईसुविधा उपलब्ध होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विकासकामे होण्यासाठी नगर परिषद आवश्यक आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

        नगर परिषद, नगर पंचायत अधिनियम 1965 नुसार 25 हजार लोकसंख्या असलेल्या शहराला नगरपरिषदेचा दर्जा देण्याची तरतूद आहे, अहेरी नगर पंचायत क्षेत्राची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 17 हजार होती, गेल्या 10 वर्षात ह्यात मोठी वाढ होऊन सध्या अहेरी नगरपंचायत क्षेत्राची लोकसंख्या ही 25 ते 30 हजारांच्या दरम्यान आहे, हे लक्षात घेऊन शासनाने अहेरी शहराला नगरपरिषदेचा दर्जा देण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याची मागणी ह्या निवेदनातुन शासनाकडे गुडेल्लीवार यांनी केली आहे.   

       अहेरी लगतच्या वांगेपल्ली आणि कोत्तुर-चिंचगुंडी ह्या दोन ग्रामपंचायतीचा समावेश करून अहेरी शहराला शासनाने नगरपरिषदेचा तात्काळ दर्जा द्यावा, अन्यथा नागपूर उच्च न्यायालयात ह्या संबंधी आपण लवकरच जनहित याचिका दाखल करु. असा ईशारा ह्या निवेदनातुन शासनाला भाजयुमो जिल्हा महामंत्री अमोल गुडेल्लीवायांनी दिला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.