Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्रातील अतिदुर्गम भागातील शेतकरी कृषीदर्शन व अभ्यास दौरा सहलीकरीता रवाना

गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकी व एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प यांचा द्वारे तापर्यंत चौदा कृषी सहलीतून 648 शेतक­यांनी घेतला कृषी दर्शन सहलीचा लाभ

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 22 ऑगस्ट – गडचिरोली जिल्ह्रातील शेतकरी पारंपरिक पध्दतीने शेती करीत आहेत. त्यामुळे शेती मधुन प्राप्त होणारे उत्पन्न तुटपुंजे असल्याने त्यांच्या आर्थिक विकासास अडथळा निर्माण होऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास अडचण निर्माण होत आहे. जिल्ह्रातील शेतकरी जिल्ह्राबाहेर पडून, पारंपरिक शेतीला बगल देत विविध क्लृप्त्यांचा वापर करीत अत्याधुनिक शेती करणा­या शेतक­यांच्या बांधावर जावुन तेथील परिस्थीतीची, आधुनिक शेती व उपकरणांची पाहणी करतील व त्या ज्ञानाचा वापर करून पारंपरिक शेती पध्दतीत बदल करतील व जिल्ह्रातील शेतक­यांची आर्थिक प्रगती व्हावी या उद्देशाने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे संकल्पनेतून गडचिरोली येथून एकुण 45 शेतक­यांकरीता गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकी व एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड यांचे संयुक्त विद्यमाने “प्रोजेक्ट उडाण अंतर्गत” पंधराव्या कृषीदर्शन व अभ्यास दौ­याचे आयोजन करण्यात आले आहे.

यापुर्वी झालेल्या एकुण चौदा कृषी दर्शन सहल व अभ्यास दौ­यांमध्ये दुर्गम भागातील विविध उपविभागातून एकुण 648 महिला व पुरुष शेतक­यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. या पंधराव्या सहलीमध्ये एटापल्ली, भामरागड व हेडरी उपविभागातील पोस्टे/उपपोस्टे/पोमकें हद्दीतील अतिदुर्गम भागातील 45 शेतक­यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या सहली दरम्यान सहभागी शेतकरी बडनेरा, अकोला, शेगाव, जळगाव, वेरुळ, राहुरी, बारामती, पुणे, परभणी, यवतमाळ, वरोरा येथील कृषी विज्ञान केंद्र तसेच विविध शेती प्रक्षेत्र यांना भेटी देणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तसेच नागपूर येथील लिंबुवर्गीय संशोधन केंद्र, गणेशखिंड जि. पुणे येथील फळ संशोधन केंद्र व अंबेजोगाई येथील सिताफळ संशोधन केंद्राला सुद्धा भेट देणार आहे. त्याचप्रमाणे शेतीविषयक अत्याधुनिक व प्रगत तंत्रज्ञान जाणुन घेणार आहेत. यामुळे ते प्रगत तंत्रज्ञानाचे अनुभव आपल्या शेती व्यवसायामध्ये वापरून आपली आर्थिक उन्नती साधुन जिवनमान उंचावतील त्यामुळे जिल्ह्रातील विकासात त्यांचे योगदान असणार आहे.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.