Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्वातंत्र्यचा अमृत महोत्सवानिमित्त सीआरपीएफ बटालियन तर्फे भव्य रॅली

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

अहेरी, 14 ऑगस्ट 2023 : देशाची सामाजिक, सांस्कृतिक, राजनीतिक आणि आर्थिक ओळख म्हणजे प्रगतशील भारत आहे. याच निमित्ताने देशातील स्वतंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याने प्राणहीता कॅम्प अहेरी स्थित केंद्रीय रिझर्व पोलीस बल 9 व 37 बटालियन द्वारे दुचाकी व चारचाकीच्या माध्यमातून स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव कॅप्टन एम एच खोब्रागडे यांच्या नेतृत्वात रॅली काढून करण्यात आला.

सदर रॅली प्राणहिता कॅम्प येथून आलापल्ली व अहेरी येथील बायपास रोड, दानशूर चौक, गांधी चौकातून परत प्राणहीता कॅम्पमध्ये विसर्जित करण्यात आली. यावेळी पोलीस दलातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी दुचाकी व चार चाकीवर भारतीय ध्वज लावून देशातील घर घर तिरंगा उपक्रम उत्तमरीत्या राबविण्यात आला. कमांडंट एम एच खोब्रागडे व इतर अधिकारी यांच्या नेतृत्वात रॅलीचे आयोजन शांततेत पार पडले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.