Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर जिल्ह्यात १७ जणांचा मृत्यूसह आज १६०३ कोरोनामुक्त तर १३११ कोरोना बाधितांची नोंद

Get real time updates directly on you device, subscribe now.

  •  आतापर्यंत 39,318 जणांची कोरोनावर मात
  •  ॲक्टीव पॉझिटिव्ह 15,534

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. 27 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 1603 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1311 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 17 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 55 हजार 680 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 39 हजार 318  झाली आहे. सध्या 15 हजार 534 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 64 हजार 93  नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 29 हजार 59 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील गजानन महाराज  चौक परिसरातील 51 वर्षीय पुरुष, दत्तनगर वार्ड येथील 62 वर्षीय महिला, स्वावलंबी नगर येथील 63 वर्षीय महिला, तुकूम येथील 60 वर्षीय महिला, पंचशील चौक परिसरातील 47 वर्षीय महिला, दादमहल वार्ड येथील 50 वर्षीय पुरुष, भेंडाळा येथील 60 वर्षीय पुरुष

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राजुरा तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष, वरोरा तालुक्यातील जिजामाता वार्ड येथील 55 वर्षीय पुरुष, बोर्डा येथील 55 वर्षीय पुरुष, कळमगव्हाण येथील 30 वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील पंचशील नगर येथील27, 33 व 66 वर्षीय पुरुष व 37 वर्षीय महिला गोंडपिपरी तालुक्यातील 63 वर्षीय पुरुष तर वणी-यवतमाळ येथील 85 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

 जिल्ह्यात आतापर्यंत 828 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 763, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 27, यवतमाळ 25, भंडारा सात, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1311 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 495, चंद्रपूर तालुका 116 बल्लारपूर 44, भद्रावती 36, ब्रम्हपुरी 75, नागभिड 80, सिंदेवाही 72, मूल 46, सावली 20, पोंभूर्णा 11, गोंडपिपरी 23, राजूरा 40, चिमूर 35, वरोरा 68, कोरपना 122, जिवती 12 व इतर ठिकाणच्या 16 रुग्णांचा समावेश आहे. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.