Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्रातील अभयारण्यामध्ये मोबाईल वापरास बंदी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी आहे. ३१ डिसेंबर रोजी  उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यातील गोठणगाव सफारी गेट येथून  एफ-२ वाघिणी आणि तिच्या पाच शावकांच्या हालचाली सुरू असताना सफारी जिप्सींनी वाघांचा मार्ग रोखला होता. त्यामुळे  अभयारण्याच्या नियमांचे उल्लंघन झाले. त्यामुळे त्यांचेवर कडक कारवाई करण्यात येवून आता राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्प आणि राष्ट्रीय उद्यानांमध्ये ही बंदी लागू करण्यात येणार आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्पात मंगळवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या निर्णयामुळे प्राण्यांचा जीवाचा धोका कमी होणार आहे. तसेच यामध्ये फोटो व्हिडिओसाठी पर्यटकांकडून प्राण्यांची अडवणूक देखील रोखता येणार आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक आणि स्वागत केले जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नागपूर जिल्ह्यातील उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यात वाघीण आणि पिल्लांचा मार्ग रोखल्याच्या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. त्यामुळे वनविभागही सतर्क झाला आहे. राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यांमधील अतिरिक्त निसर्ग पर्यटनाला आळा घालण्यासाठी मानक प्रक्रिया (SOP) तयार करण्यासाठी आता कारवाई तीव्र करण्यात आली आहे.

अशा घटनांना आळा घालण्यासाठी बोर व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात असून  भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी त्यांनी उपाययोजना सुचवल्या आहेत. यामध्ये पर्यटक, निसर्ग मार्गदर्शक आणि जिप्सी चालकांना सफारीदरम्यान मोबाईल फोन वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. सफारी मार्गांवर नियमित गस्त वाढविण्याच्या सूचना क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वन्यजीव शोधण्याच्या ठिकाणी जिप्सीला जास्त काळ थांबत येणार नाही. एसओपी वाहनाचा वेग, पर्यावरण पर्यटन आणि वन्यजीव संवर्धन आणि मार्गदर्शक आणि जिप्सी चालकांसाठी विशेष बैठका आणि कार्यशाळा आयोजित करून  संवेदनशीलतेवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. यामधून पूर्णपणे शिक्षित चालक व गाईड ठेवण्यात येणार आहे. या कार्यशाळेमुळे प्राण्यांसह पर्यटकांचे देखील संरक्षण होईल.

आता राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्प आणि राष्ट्रीय उद्यानांमध्ये ही बंदी लागू करण्यात येणार आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पात मंगळवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या निर्णयामुळे प्राण्यांचा जीवाचा धोका कमी होणार आहे. तसेच यामध्ये फोटो व  व्हिडिओसाठी पर्यटकांकडून प्राण्यांची अडवणूक देखील होणार नाही. या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक आणि स्वागत केले जात आहे.

हे ही वाचा,

 

चोरी झालेले ५३ मोबाइल शोधण्यात पोलिसांना यश..

 

शीर वेगळा धड प्रकरणाचा देवरी पोलिसांनी लावला छडा…..तो घात नसून अपघातच….चित्त थरारक मनाला हेलकावणारी घटना…

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.