Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

केंद्र सरकारच्या विरोधातील मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक : बैलबंड्यांसह शेतकरी झाले मोर्चात सहभागी.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:  

गडचिरोली, दि. २६ नोव्हेंबर: केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार विरोधी विधेयकांचा विरोध करण्यासाठी देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षातर्फे काढलेला मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही शेतकऱ्यांच्या बैलबंड्यासह जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.

शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते आणि जयश्री वेळदा यांच्या नेतृत्वात बैलबंड्यांसह हा मोर्चा काढण्यात आला.
भारतबंदच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर गांधी चौक येथून शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी,कामगार आणि शासकीय – निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रसरकारने शेतकरी आणि कामगारांना देशोधडीला लावण्याचा घाट रचला असून तो कदापी यशस्वीहोऊ देता कामा नये यासाठी केंद्र सरकार विरोधात २६ नोव्हेंबरला देशव्यापी आंदोलन पुकारण्यात आले होता. या कायद्यातील तरतूदी अतिशय भयानक आहेत.सिलींग रद्द, शेतकरी असण्याची अट रद्द करण्यात आली आहे. शेतकर्‍यांच्या पिकाला हमी भाव दिला जाणार नाही. महत्वाचा भाग असणारे कृषी उत्पन्न बाजार समित्याच रद्द करण्याचा घाट देखील केंद्राने घातला आहे.त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या प्रश्‍नांप्रमाणेच गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडून वैनगंगा नदीला आलेल्या कृत्रिम महापूराने झालेले नुकसान अजूनही सरकारकडून भरपाई करून देण्यात आलेले नाहीत. कित्येक नुकसानग्रस्त मदतीपासून वंचितच राहण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे ओढवलेली भयंकर परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी महिला बचत गटाचे कर्ज माफ करुन नव्याने आर्थीक मदत देण्याची गरज आहे. तसेच या काळात आलेले भरमसाठी विज बील पुर्णपणे माफ केलेच पाहिजे.नोंदणीकृत बांधकाम कामगारांना लाॅकडावून काळातील नुकसानीपोटी आर्थिक मदत करण्यात यावी. शासकीय-निमशासकीय सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन आणि २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी,या मागण्याही या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत.

मोर्चात जिल्हा सह चिटणीस भाई संजय दुधबळे,जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, युवक जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर,भाई अशोक किरंगे,भाई चंद्रकांत भोयर,भाई दामोधर रोहनकर,भाई प्रदिप आभारे,भाई गंगाधर बोमनवार,भाई महागूजी पिपरे, तुकाराम गेडाम,सुनील कारेते, विजया मेश्राम, मंदाताई आवारी,किसन साखरे, मनोहर ठाकरे यांच्या सह शेकडो शेतकऱ्यांनी आणि महिला बचत गटांच्या महिलांनी मोर्चात सहभाग घेतला होता.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.