Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबई मध्ये आलेल्या शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देणार, शरद पवार

Get real time updates directly on you device, subscribe now.

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने 26 जानेवारीला राजभवनावर मोर्चा धडकणार शरद पवार स्वतः उपस्थित राहणार आहेत. 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क 24 जानेवारी:- अखिल भारतीय किसान सभेच्या विराट मोर्चानं मुंबईकडे कूच केली आहे. या मोर्चामध्ये ट्रॅक्टर, जीप इत्यादी वाहनांसह हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. 26 जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर धडकणार आहे. या मोर्चाद्वारे केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन कृषी कायद्याविरोधात गेल्या 60 दिवसांपासून दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सबंध महाराष्ट्रातील शेतकरी मुंबई येथे येऊन आंदोलन करणार आहेत या आंदोलनाला आता शरद पवारांनी देखील पाठिंबा दिला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.